व्होट जिहाद २.० ते डिटेन्शन सेंटर्स! बेकायदेशीर घुसखोरीवर महाराष्ट्राचं रोखठोक उत्तर, इतर राज्यांचा आढावा
आज भारताच्या अंतःस्थ भागांपर्यंत झिरपलेली बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक रचनेला खिळखिळं करते आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत लोकसंख्यात्मक बदल, बनावट ओळखपत्रं आणि कायद्याला सुरुंग लावणारे प्रकार वाढले आहेत. बेकायदा घुसखोरांमुळे रोजगाराची अनिश्चितता, वाढती गुन्हेगारी, दहशतवादाचा धोका, भारतीय नागरिकांसाठी असलेले लाभ गिळंकृत करत खऱ्या भारतीय नागरिकांना वंचित करणे हे सर्रास घडते आहे.